बेहराम
कॉन्ट्रॅक्टर
दर शनिवारी
सकाळी, मुंबईतील एक ज्येष्ठ लेखक बेहराम काँट्रॅक्टर टाइपरायटर घेऊन साप्ताहिक
स्तंभ लिहित असत. त्या स्तंभाचे (कॉलम) नाव राउंड अँड अबाऊट. ते बिझीबी या नावाने
लिहित असत. द आफ्टरनून डिसपॅच अँड कुरियर या सायंदैनिकासाठी त्यांचे हे लेखन होते.
त्याच दिवशी लिहून त्याच दिवशी प्रसिद्ध होणारा त्यांचा हा स्तंभ होता. सकाळी
साडेपाच वाजता टाइम्स ऑफ इंडिया त्यांच्या घरी येत असे व त्यांनी टीका टिप्पणी
करायला विषय मिळत असत. शनिवारचे राउंड अँड अबाउट वेगळे होते व ते अँड फऑर अ
सॅटर्डे अ फ्यू स्ट्रे थॉटस अँड फ्यू जनरल ऑब्झर्वेशन्स या ओळींनी सुरू होत असे.
या ओळीनंतर ते अनेक मते मांडत असत. काहीवेळा ती एका ओळीत काही वेळा दोन ओळीत असत.
प्रत्येक ओळ लाइक या शब्दाने सुरू होत असे. उदा. लाइक देअर इज नो बिझीनेस लाइक
मुव्ही बिझीनेस . इफ यू डू नॉट बिलीव्ह मी
गो सी डॉ. झिवागो अट द रीगल धीस इव्हिनिंग, पुस्तके व चित्रपट तेवढीच
चांगली आहेत असे उदाहरण झिवागो यांच्या बाबतीत होते,
बिझीबी म्हणजे बेहराम काँट्रॅक्टर यांचे एक
वैशिष्ट्य होते ते त्यांना तसे का वाटते याचे स्पष्टीकरण करीत असत. पण ते वाचकांना
काही गोष्टी माहिती व्हाव्यात असे समजून लिखाण करीत असत. त्यांचे लिखाण सोपे व
साधे होते व त्यांचा दृष्टिकोन हा सामान्य विवेकावर आधारित होता, त्यात युक्तीवाद
फार नसायचा. त्यांच्या शनिवारच्या स्तंभाचा शेवट नेहमी अँड द फायनल पॉइंट ऑफ
व्ह्यू या वाक्याने होत असे व सुरूवात दॅटने होत असे websitewww.busybeeforever.com
ऑक्टोबर 1996 मध्ये त्यांनी शेवटचे वाक्य लिहिले होते
की, दॅट आय हॅव ऑबझर्व्हिंग मि. बाळासाहेब
ठाकरे . इन द बिगीनिंग ही वॉज अगेन्स्ट साउथ इंडियन्स देन अगेन्स्ट गुजरातीज देन
मुस्लिम्स अँड नाऊ ही इज अगेन्सट जजेस.
बिझीबी यांनी 36 वर्षे लिखाण केले. 1955 मध्ये त्यांनी
सुरू केलेले लिखाण नंतर थांबले त्यांचा 2001 मध्ये मृत्यू झाला.इंग्रजीत शैलीदार व
व्यक्तीगत अनुभवाधारित लिखाण करणारे ते स्तंभलेखक होते. हेमिंग्वे प्रमाणेच
त्यांना लिखाणाचा सूर लहान वयातच सापडला होता. कमी जागेत जास्त विचारसंपन्न लिखाण
त्यांनी केले. कमी शब्दात लिखाण त्यांना साधले होते. आपली मते नेहमीच सारखी नसतात
ती एकमेकांशी जुळत नाहीत पण ते आपल्या मतांवर ठाम होते, त्यामुळे त्यांनी बिझीबी
हे पात्र निर्माण केले. काही गोष्टींबाबत कुतूहल असलेला माणूस व त्याची जाणून घेण्याची
इच्छा त्यातून प्रतीत होते. लिहिण्यापूर्वी ते विचार करूनच शब्द वापरीत असत,
त्यांनी त्यांच्या लिखाणाचे एक जग निर्माण केले होते. त्यांना मुले नव्हती तरी ते
डॅरिल व डेरेक या मुलांविषयी ते लिहीत. त्याचा एक बोलका कुत्रा बोलशोई कुत्रा होता
त्याचे नाव बॉक्सर. त्यांचे गुजराती शेजारी होते ते श्रीमंत व सतत कशा बद्दल तरी
गूढ बाळगत असत, या शेजाऱ्याला ते आमच्या 26 व्या मजल्यावरील माझा मित्र असे
संबोधित असत. राऊंड अँड अबाऊट हा दक्षिण मुंबईशी संबंधित स्तंभ होता. इतर
उपनगरांचा उल्लेख त्यात येत नसे खरेतर जास्त लोक तर याच भागात रहात असत. बिझीबी
यांना ब्रिटीश काळातील मुंबई हीच खरी मुंबई असे त्यांना वाटत असे. आल्डस हक्सले
याने 1920 मध्ये जेसलिंह पायलेट हे पुस्तक लिहिले होते तशीच शैली बिझीबी यांची
होते. उपनगरांची वसाहत सुरू झाली तेव्हा त्यांनी त्यातील दोष दाखवले होते. मुंबई थांबते
तेव्हा उपनगरे सुरू होतात असे ते म्हणत असे. बिझीबी यांना काही बाबींमध्ये रस होता
त्यामुळे त्यांचे लेखन व्यापक होते. रेस्टॉरंटवर ते लेखन करीत असत त्यांचे
खानपानातील ज्ञान खूप होते त्यांना अन्नपदार्थांविषयी स्तंभ चालवण्यास आवडत असे.
त्यांनी केलेले अन्नाचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटत असे. दक्षिण मुंबईतील अनेक
रेस्टराँ त्यांना त्यांच्या हॉटेलविषयी लिहण्यासाठी आमंत्रित करीत असत. उच्चभ्रू
संस्कृतीविषयी ते लिहित नसत. अभिजात किंवा शास्त्रीय व हिंदुस्थानी संगीतावर
लिहिण्याच्या वाटेला ते गेले नाहीत. त्यांना नाटक, चित्रपट यात रस होता ते एडवर्ड
एच फिपसन या नावाने चित्रपट व नाटके यांचे रसग्रहण करत असत. त्यांना सांगितिका
आवडत असत. दिवस रात्रीचे क्रिकेट प्रेक्षकांना आकर्षित करण्यास चांगले असे त्यांचे
मत होते. एक तर त्यावेळी शांतता असते व केवळ दिवे चमचमत असतात. अतिशय नाट्यमय असे
वातावरण त्यात असते. नाटकासारखे वातावरण तिथे तयार होते. स्क्रीनवर थर्ड अंपायरने
दिलेला निकाल त्यांना मैदानावरील अंपायरपेक्षा जास्त भावत असे पण त्यावेळी
पडद्यावर निर्णयाची पद्धत सुरू झालेली नव्हती.बिझीबी हे एकाकी होते पण ते त्या
काळात पत्रकारितेत मुलाखती घेणाऱ्या मोजक्या चांगल्या पत्रकारांपैकी एक होते.
त्यांनी एकदा राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांची मुलाखत घेतली होती, तेव्हा राज्यपाल
दाढी करताना आल इंडिया रेडिओच्या बातम्या एकतात असे सत्य त्यांनी उघड केले होते.
ब्रिटीश काळावर त्यांचे प्रेम होते बालपणच्या मुंबईविषयी लिहिताना ते स्मरणरंजनात
जात असत 1930 ते 1940 चा तो काळ होता. फोर्ट भागातील बाजार व दुकाने त्यांना आवडत.
तिथे इतिहासाला भूगोल भेटतो असे ते म्हणत असत. आता शहराची जी अवस्था आहे त्याबाबत
त्यांच्या मनात कडवटपणा नव्हता. ज्यांनी राज्य केले त्या भारतीयांनीच मुंबईची वाट
लावली. खलीद हसन जसे पात्रे जिवंत करीत असत तीच शैली बिझीबी वापरत असत त्यांनी
पारशी समाजाविषयी फारसे लिहिलेले नाही. मुंबईत समाजाने जे काम केले होते त्याविषयी
मात्र त्यांनी लिहिले होते. ते एकेठिकाणी म्हणतात की, मी पहिली पारशी व्यक्ती
पुतळ्यांमधून पाहिली. त्यांच्या मते सर्व भारतीय एकच आहेत. राजकारण व
राज्यकारभाराच्या नावाखाली किंवा कायद्याच्या नावाखाली काही चुका होत आहेत.
त्यांचे लेखन निराशावादी कधीच नव्हते व त्यामुळे ते लोकांना आवडत असे. काहीवेळा ते
खरे असायचेच असे नाही. बिझीबी यांचा विवाह फरझाना नावाच्या महिलेशी झाला होता.
त्या अप्पर क्रस्ट नावाचे नियतकालिक चालवित असत. त्यांनी दुपारी जो पेपर निघायचा
त्यातूनच हे नियतकालिक सुरू केले पण बेहरामच्या मृत्यूनंतरही मालकाला दिले नाही.
बेहराम काँट्रॅक्टर हे सडपातळ अंगकाठीचे होते, रंगीत टी शर्ट स्लॅक्स ते घालत असत
व नेहमी शांत असत. निरीक्षण करीत असत. कार्यालयात त्यांना स्वतंत्र खोली नव्हती,
पन्नासच्या सुमारास ते मिडडे मध्ये काम करीत होते. खालीद ए एच अन्सारी
यांच्याबरोबर त्यांनी एक पेपर सुरू केला. एकदा टॅक्सी न मिळाल्याने ते रस्त्यावरच
झोपले होते.
No comments:
Post a Comment